योजनेचा तपशील
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागमार्फत राबवली जाणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण राज्य पुरस्कृत गृहनिर्माण योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्गातील बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना स्वतःचे हक्काचे पक्के घर बांधून देणे हा आहे
पात्रता निकष
अर्जदार हा अनिवार्यपणे अनुसूचित जाती (SC) किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा किमान १५ वर्षांचा रहिवासी असावा.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी ₹१.२० लाखांपर्यंत आणि शहरी भागासाठी ₹३.०० लाखांपर्यंत असावे.
अर्जदाराकडे स्वतःची जागा किंवा कच्चे घर असणे आवश्यक आहे.
अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा
योजनेचे फायदे
नवीन घर बांधण्यासाठी लाभार्थ्याला थेट बँक खात्यात आर्थिक मदत दिली जाते. घराचे बांधकाम किमान २६९ चौरस फूट चटई क्षेत्राचे (Carpet Area) असणे आवश्यक आहे.घरकुल बांधकाम अनुदान: शासन निर्णयानुसार घरकुलासाठी ₹१,२०,००० ते ₹२,५०,००० पर्यंतचे आर्थिक अनुदान क्षेत्रानुसार दिले जाते
.जागा खरेदीसाठी मदत: जर पात्र लाभार्थ्याकडे स्वतःची जागा नसेल, तर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजने अंतर्गत जागा खरेदी करण्यासाठी ₹१,००,००० पर्यंतचे अतिरिक्त अनुदान दिले जाते.
मनरेगा (MGNREGA) रोजगार: घरकुलाच्या बांधकामासाठी मजुरी म्हणून मनरेगाअंतर्गत ९० ते ९५ दिवसांचा रोजगार (अंदाजे ₹२५,०००+ अतिरिक्त) मिळतो.
शौचालय बांधकाम: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी वेगळे ₹१२,००० चे अनुदान मिळते.
आवश्यक कागदपत्रे
सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
सक्षम प्राधिकरणाचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
जागेचा पुरावा: ७/१२ उतारा, मालमत्ता पत्रक (Property Card) किंवा ग्रामपंचायतीचा नमुना नंबर ८ चा उतारा
आधार कार्ड आणि रेशन कार्ड
रहिवासी दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट)बँक पासबुक (बँक खाते आधारशी लिंक असावे)
सध्याच्या कच्च्या घराचा किंवा मोकळ्या जागेचा फोटोयापूर्वी गृहनिर्माण योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र/ज्ञापपत्र
अर्ज प्रक्रिया
ग्रामीण भाग: ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची निवड प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या 'ड' यादी किंवा कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतून केली जाते. यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामसेवक यांच्याकडे विहित नमुन्यात कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागतो